वाढत्या प्रदुषणामुळे सोनिया आणि राहूल यांनी दिल्ली सोडली

November 21,2020

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पत्र राहूल गांधी यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली शहर सोडले असून ते आता पुढचे् काही दिवस गोव्यात राहणार असल्याचे त्यांनी काही वेळेपूर्वी पणजी विमानतळावर आल्यानंतर सांगितले. या दोघांचाही मुक्काम गोव्यात काही दिवस राहणार आहे. दिल्लीची हवा मानवत नसल्याने सोनिया गांधी यांना काही दिवसांसाठी शहर सोडवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, त्यानंतर आता कांँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र खासदार राहूल गांधी हे गोव्यात दाखल झाले आहे.

बिहारचा पराभव ही आपल्याला सामान्य बाब वाटते आहे का, असे वक्तव्य कपिल सिब्बल करत काँग्रेसला घरचा अहेर दिला होता. त्यानंतर त्यांना सलमान खुर्शीद आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी खडे बोल सुनावले होते.

बिहारच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षातही अंतर्गत बंडाळी सुरु झाल्या आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळ्या सुरु असताना सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांनी दिल्ली सोडली आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडणार का? की हा अंतर्गत वाद आणकी वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.