खडसेंची फडणवीसांवरील टिका चुकीची : अजय पाटील

October 24,2020

नागपूर, 24 ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपातून पक्षत्याग करणे दुःखद आहे. पण या पक्षत्यागानंतर खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे मत भाजप नेते अजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर बहुजन समाजातील नेते व कार्यकर्ते पक्षापासून दूर जातील अस भासविण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्यक्षात पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारने संभाजी राजे, उदयन राजे, प्रतापराव भोसले त्यांचे चिरंजीव मदन भोसले यांच्यासारखे बहुजन समाजाचे दिग्गज नेते भाजपात आले. त्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र, खान्देश मराठवाड्यातील जिल्हा परिषदेत यश आले. त्यामुले पक्षत्यागासाठी व्यक्तिगत कारणे आहेत. मात्र राजकारणात स्वतःच्या बचावासाठी इतरांवर अन्याय करणे चुकीचे आहे. विदर्भात आजवर झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयात मोठा वाटा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. असेही अजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.