अर्णब गोस्वामी आणि पार्थदासगुप्ता यांच्यातील चॅटची गृहमंत्रालय करते आहे चौकशी - अनिल देशमुख

January 19,2021

मुंबई - अर्णब गोस्वामी आणि बार्क माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थोदास गुप्ता यांच्यातील व्हाटस्अँप  संभाषण बाहेर आल्यानंतर अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पुलवामा हल्ला प्रकरणी व्हायरल झालेल्या चॅट विषयी राज्याचे गृहखाते चौकशी करत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाशिकमध्ये सांगितले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे व्हायरल झालेले चॅट अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अनेक गोष्टी या चॅटमध्ये असल्याचा धक्कादायक अंदाज गृहविभागाने वर्तवला आहे. पुलवामा आणि बालाकोट इथं झालेल्या हल्ल्याच्या इतक्या संवेदनशील गोष्टी अर्णबला कशा कळल्या याची माहिती घेण्यात येत असून उद्या यासंदर्भात बैठक घेऊन कारवाईची दिशा ठरवणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. गृहमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे.