जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

January 28,2021

नागपूर : २८ जानेवारी - 'जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीमध्ये लेखक भालचंद्र नेमाडे यांनी लभान बंजारा समाजातील स्त्रियांवर आक्षेपार्ह लिखाण केल्यामुळे, या कादंबरीवर बंदी आणावी, अशी मागणी बंजारा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.

समाजाच्या विविध संघटनांच्यावतीने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन पाठविण्यात आले. भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, सती सामकी माता बंजारा समाज महिला संघटना, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, संत सेवालाल महाराज ज्येष्ठ नागरिक मंडळ, संत सेवालाल महाराज महोत्सव समिती, गोर शिकवाडी या विविध संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायक आत्माराम चव्हाण, अॅड. बद्रीप्रसाद चव्हाण, प्रा. मोहन चव्हाण, प्राचार्य लक्ष्मण राठोड, भारतीय बंजारा समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश चव्हाण, सचिव मोरेश्वर राठोड, डॉ. प्रकाश राठोड, आत्माराम राठोड, नामा बंजारा, रामराव राठोड, बी. डी. चव्हाण, एकनाथ पवार, जयश्री राठोड, नलिनी पवार, राजश्री राठोड, मेनका चव्हाण, रामराव चव्हाण, श्रीकांत राठोड आदी उपस्थित होते. लेखक आणि प्रकाशकांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.