रस्त्यावरील वादातून चौघांनी केला प्राणघातक हल्ला

March 04,2021

वर्धा : ४ मार्च - सेलू येथील यशवंत चौकात विकी विजय तवलारे याने गाडी चांगली चालवा अपघात होईल असे म्हटल्याने चौघांनी विकीवर प्राणघातक हल्ला केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमाकरिता अभिषेक लोणकर (20), प्रसाद लोणकर (19), अक्षय सवंतकर, प्रतीक टापरे (18), विकी तवलारे (21), सचिन झोटिंग आणि सुधाकर सलाम हे सहा जण दोन दुचाकींनी यशवंत चौकात येत होते. पुढे असलेली दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे विकीने त्यांना गाडी चांगली चालवा अशी समज देताच दोघांनी विकीवर चाकूने वार केले. त्यानंतर घटनास्थळावरून सहाही जणांनी दोन दुचाकींनी पळ काढला. या घटनेची सेलू पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली असून दोन जण फरार झाले. पोलिसांनी आरोपींकडून 4 मोबाईल तसेच दोन दुचाकी जप्त केली. पुढील तपास सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे, नितीन नलावडे, अनिल भोवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे चेतन बोरखडे, राजू वैद्य, इमरान खिलची करीत आहेत.